https://images.loksatta.com/2020/05/new-kedar-1.jpg?w=830

कापूस खरेदी केंद्राने रोज किमान 100 शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करावा : सुनिल केदार

पणन महासंघाने  ग्रेडर उपलब्धता वाढवून संकलन केंद्रावरील कापूस गाठी व सरकीची उचल करण्याचेही निर्देश

by

आणीबाणीच्या  काळात शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण  शासन अवलंबित  असून, लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांचा बराच कापूस शिल्लक राहिलेला आहे.  हा सर्व कापूस पावसाळा सुरु होण्यापुर्वी विक्री होणे आवश्यक आहे.  यासाठी कापूस खरेदी केंद्राने रोज  किमान 100 शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करावा. पणन महासंघाने  ग्रेडर उपलब्धता वाढवून संकलन केंद्रावर असलेल्या कापूस गाठी व सरकीची उचल करावी,  अशा सूचना राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा वर्धा जिल्हयाचे पालकमंत्री सुनिल केदार यांनी केली आहे.

पालकमंत्री केदार यांनी   जिल्हयातील  14 जिनींग व  प्रेसिंगला भेट दिली. वर्धेत दाखल होताच त्यांनी भेटीचा सपाटा लावला, संकलन केद्रावर कापूस खरेदीसाठी जिनिंगला असलेल्या समस्या,  बाजार समितीच्या सचिव पणन महासंघाचे  ग्रेडर व जिनिगच्या संचालकांसोबत चर्चा करुन त्यांच्याही समस्या जाणून घेतल्या. यावेळी सेलू येथील गोल्ड फायबर जिनिंग  येथे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार,  जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे, तहसिलदार महेद्र सोनवने, गोल्ड फायबर जिंनिंगचे संचालक  सिंघानिया उपस्थित  होते. तर हिंगणघाट येथे  आमदार समीर कुणावार, सुधिर कोठारी,  माजी आमदार राजु तिंमाडे,  देवळी येथे आमदार रणजित कांबळे यांची उपस्थिती होती.

कापूस खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या कापसाची प्रासेसिंग करुन गाठी बनविण्यात येतात.  मात्र गाठी व सरकीची उचल  पणन महामंडळाद्वारे  होत नसल्याच्या समस्या  जिनिंग संचालकांनी मांडल्यात.  तर, सीसीआयकडे  गोडाउनची उपलब्धता कमी असल्यामुळे  कापूस मालाची उचल कमी होत आहे, असे सीसीआयच्या अधिका-यांनी  सांगितले. यावर  केदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना गोडाउन उपलब्ध करुन देण्याची सूचना केली.

कापूस संकलन केंद्रावर दररोज किमान 100 शेतक-यांच्या कापसाची खरेदी झाली, तरच  पावसाळया पूर्वी सर्व शेतक-यांचा कापूस खरेदी होऊ शकतो.  सीसीआयकडे आवश्यक ग्रेडर कमी असल्यामुळे बाजार समित्यांनी  त्यांच्याकडचे  ग्रेडर तसेच आवश्यक मनुष्यबळ सीसीआयला पुरवावे. शनिवार या सुटीच्या दिवशी सुध्दा शेतक-यांच्या कापसाची खरेदी सुरु ठेवावी.   जिल्हयातील  एकही शेतकरी कापूस विक्री पासुन वंचित राहू नये यासाठी बाजार समितीत्यानी  सीसीआयसोबत समन्वय साधून  काम करावे, अशा सूचना  केदार यांनी केल्या.  यावेळी  सर्व नगर पालिकांना सूचना देऊन नगर पालिकेच्या फायर ब्रिगेड गाडया  कर्मचारी वर्गसह  तत्पर ठेवण्यासही त्यांनी सांगितले.

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.