https://images.loksatta.com/2020/05/anil-gote.jpg?w=830
संग्रहित छायाचित्र

शरद पवार यांची इच्छा असेल तरच सरकार पडेल

अनिल गोटे यांचा दावा

by

शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या महाविकास आघाडीचे सरकार हे शरद पवारांनी स्थापन केलेले सरकार असून ते त्यांच्या इच्छेनेच पडेल, असा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकाव्दारे केला आहे.

महाराष्ट्रातील सत्ता भाजपच्या हातून हिसकावून घेतल्यामुळे भाजपचे नेते ताळतंत्र सोडून वाटेल तसे बरळत सुटले आहेत. अकारण बरळण्याची आणि वाचाळपणाची भाजप नेत्यांची सवय जुनीच असल्याची टीका गोटे यांनी केली.

आकाशपाताळ एक करुन पंतप्रधानसह सर्व नेत्यांच्या सभांचे आयोजन करुनही केवळ १०५ वर भाजपची गाडी अडकली. सध्या भाजपच्या एकाही नेत्याला कुणीही गांभीर्याने घेत नाही. कहर म्हणजे सरकार पडण्याच्या तारखा देण्याला सुरूवात केली.

मात्र शरद पवारांनी स्थापन केलेले सरकार त्यांच्या इच्छेनेच पडेल. सत्तेचा गोवर्धन तसूभर हलणार नाही. भाजपचे वाचाळ महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारची एक विटही हालवु शकले नाही.  उलटपक्षी अकारण रोज उठून शासनावर टीका करायची.

आघाडीच्या घटक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांविरुध्द बरळत राहणे, त्यांना टिकेचे लक्ष्य करायचे, अशा नियोजनशुन्य राजकीय बालीशपणामुळे भाजपला कुणी गांभीर्याने घेत नाही, असे गोटे यांनी म्हटले आहे.

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.