https://images.loksatta.com/2020/01/Ramnath-Kovind.jpg?w=830

Budget 2020: जम्मू काश्मीरमधून ३७० कलम हटवण्याचा निर्णय ऐतिहासिक – रामनाथ कोविंद

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून झाली असून याआधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं अभिभाषण झालं

by

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून झाली असून याआधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं अभिभाषण झालं. यावेळी त्यांनी नव्या भारताल गती द्यायची असल्याचं सांगितलं. तसंच हे दशक भारतासाठी फार महत्त्वाचं असून नव्या भारताच्या निर्माणासाठी गती द्यायची आहे. हे दशक भारताचं असावं यासाठी सरकारकडून पाया रचण्यात आला आहे असं रामनाथ कोविंद यांनी सांगितलं. रामनाथ कोविंद यांनी यावेळी जम्मू काश्मीरमधून ३७० कलम हटवण्याचा निर्णय ऐतिहासिक पाऊल असल्याचा उल्लेख करत केंद्र सरकारच्या निर्णयाचं कौतुक केलं. सोबतच लडाखमधील नागरिकांचंही अभिनंदन केलं. जम्मू काश्मीरमधील नागरिकांनाही मुलभूत हक्क मिळण्याचा अधिकार असल्याचं रामनाथ कोविंद यांनी यावेळी सांगितलं.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सदस्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देत अभिभाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी सांगितलं की, “या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार झाल्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो. माझं सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे गेल्या पाच वर्षात भारताचा मजबूत पाया रचण्यात आला आहे. हे दशक आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. या दशकात भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. आपलं संविधान या संसेदकडून तसंच त्याच्या प्रत्येक सदस्याकडून राष्ट्रहिताला प्राधान्य देत देशवासियांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी योग्य कायदा करण्याची अपेक्षा ठेवतं. गेल्या सात महिन्यात संसेदत अनेक इतिहास रचण्यात आल्याचा मला आनंद आहे”.

“माझ्या सरकारचं स्पष्ट मत आहे की, चर्चा आणि संवाद लोकशाहीला मजबूत करण्याचं काम करतात. तर दुसरीकडे कोणत्याही प्रकारची हिंसा समाज आणि देशाला दुबळं बनवण्याचं काम करते,” असंही यावेळी रामनाथ कोविंद यांनी सांगितलं.

रामनाथ कोविंद यांनी यावेळी जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवणं हा ऐतिहासिक निर्णय असल्याचं म्हटलं. यामुळे काश्मीर विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडला गेला असल्याचं त्यांनी सांगितलं. “३७० कलम आणि ३५ हटवलं जाणं फक्त ऐतिहासिक नाही तर यामुळे त्यांच्या विकासाची दारं खुली झाली आहेत. जम्मू काश्मीर आणि लडाखचा विकास, तेथील संस्कृती आणि परंपरेचं रक्षण, पारदर्शी कारभार करणं माझ्या सरकारची प्राथमिकता आहे,” असं रामनाथ कोविंद यांनी सांगितलं.

रामनाथ कोविंद यांनी यावेळी सरकारने केलेल्या कामांचा आढावा घेतला. तसंच केंद्र सरकारने केलेल्या कामांमुळे भारताने अनेक जागतिक रॅकिंगमध्ये उडी मारली असल्याचं सांगत अभिनंदन केलं. रामनाथ कोविंद यांनी यावेळी अयोध्येतील राम मंदिराच्या निर्णयानंतर देशवासियांना शांतता राखल्याबद्दल प्रशंसा केली.